लोणी काळभोर : विद्येचे माहेर घर आणि राज्याचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या पुण्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. पुणे पोलिसांनी तब्बल ३ हजार ५०० कोटी रुपयांचे ड्रग्स पकडत जप्त केले होते. दरम्यान, ही कारवाई ताजी असतांनाच पुण्यात कोयता गँगच्या टोळक्यांनी उच्छाद मांडला असल्याचे पुढे आले आहे. गुरुवारी पहाटे कदमवाकवस्ती परिसरात सात जणांच्या टोळक्याने हातात कोयत्ता फिरवत रस्त्यात दहशत माजवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत कायम आहे. तरुणांची काही टोळके हातात कोयते घेऊन सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवत असून अद्याप त्यांच्यावर नियंत्रण बसवण्यात पुणे पोलिसांना यश आलेले नाही. कदमवाकवस्ती परिसरात रोज रात्री कदमवाकवस्ती परिससारतील पुणे सोलापूर रोड जवळ ७ ते ८ तरुण हातात कोयते घेऊन गाड्यांचे सायलेन्सर नियमबाह्य कर्कश आवाज करत रात्रीच्या वेळी रस्त्यावरून दुचाकीवर येणाऱ्या नागरिकांना महिलांना या टोळक्याने त्यांना रस्त्यात अडवत असल्याची माहिती समोर आली आहे
भररस्त्यात करण्यात आलेल्या अशा घटनांमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. पुण्यात गुंडांना कायद्याचा धाक उरला नाही का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हे टोळके धावत येत दुचाकी अडवतात आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीची भीती दाखवून त्यांच्या कडून पैसे उकळतात “खबरदार पोलिसांत गेल्यास तुला पुन्हा याच रोडने जायचे आहे“असा दमही भरतात भीतीने सर्वसामान्य व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास भित असल्याच्या या घटनेची कदमवाकवस्ती परीसरात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
दरम्यान, पुण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी काही पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांची परेड घेतली होती. तसेच त्यांना तंबी देखील दिली होती. मात्र, असे असतांनाही पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सुरूच आहे. कदमवाकवस्ती कवडीपाठ येथे देखील काही तरुणांनी हातात मोठे धारदार कोयते घेऊन गाड्यांचा मोठा कर्कश आवाज काढत रोज रात्री दहशत वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे . यानंतर नागरिक कामावरून घरी परत येताना रात्री घाबरत असल्याचा प्रकार कदमवाकवस्ती परिसरात घडत असल्याचे चित्र समोर आले आहे जीवाला घाबरून नागरिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी घाबरत असल्याची चर्चा सध्या कदमवाकवस्ती परिसरात रंगताना दिसत आहे. त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना आखणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे