पुणे – राष्ट्रीय स्वास्ध प्राधिकरण महाराष्ट्र शासन तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची जिवघेणी कसरत होताना दिसून येत आहे. ससून रुग्णालयात रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतरही तीन – चार दिवस ताटकळत ठेवले जात आहे.
ससून हॉस्पिटलमध्ये सरकारी योजनेतून रुग्णावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांनी डाॅक्टरांतर्फे डिस्चार्ज देण्यात येतो. डिस्चार्ज ची संपूर्ण प्रक्रिया ही १०० नंबर विभागातर्फे पुर्ण करण्यात येते. डिस्चार्ज ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ची कागदपत्रे संबंधित वाॅर्ड मध्ये जमा केल्यानंतर रुग्णाला सोडले जाते परंतु १०० नंबर विसागात डिस्चार्ज ची प्रक्रिया ही तीन तीन चार चार पुर्ण होत नसल्याने रुग्णाला वाॅर्ड मध्येच पुढील मुक्काम करावा लागत आसल्याची भयानक स्थिती निर्माण झालेली आहे.
सदर योजनेतून रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉ तर्फे उपचारा बाबतची कागदपत्रांची फाईल १०० नंबर विभागात नातेवाइकांतर्फे सादर केल्या जातात.परंतु तेथील कर्मचारी हे त्या कागदपत्रात त्रुटी आसल्याचे सांगून ती डाक्टरातर्फे फेर दुरुस्ती करून आणण्यासाठी फाईल जमा करून न घेता पुन्हा नातेवाइकांकडे देतात.फेर दुरुस्ती साठी संबंधित डाॅक्टरांकडे गेल्यास डॉ जागेवर नसतात .ते शस्त्रक्रीया विभागात व्यस्त आसतात त्यामुळे फाईल वरील फेर दुरुस्ती होत नाही. त्या दिवशी डॉक्टरांची भेट न झाल्यास दुसर्या दिवसांची वाट पहात बसावे लागते.दुसर्या दिवशी डॉक्टरांची भेट झाली तर फेर दुरुस्ती साठी थांबा थोडे असे सांगून डॉक्टरदेखील रुग्णाला ताटकळत ठेवतात.दुसर्या दिवशी फाईल मधील दुरुस्ती झाल्यानंतर ती फाईल पुन्हा १०० नंबर विभाडाकडे सादर केली जाते.पुन्हा त्या फाईल मध्ये चुका काढल्या जातात.त्या चुकाची फेर दुरुस्ती साठी पुन्हा डाॅटरांकडे पाठवले जाते अशा प्रकारे ही डिस्चार्ज ची प्रक्रिया पूर्ण करण्यास तीन – चार दिवसांचा अवधी घेतला जात आहे.
म्हणेच शस्त्रक्रिया करणारे डाॅक्टर व १०० नंबर विभागातील कर्मचारी यांचे मध्ये समन्वय साधला जात नसल्याने रुग्णाला व नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
रुग्णांचे काही नातेवाईक हे अशिक्षित असल्याने ते डिस्चार्ज करताना सैरभैर अवस्थेत इकडून तिकडे आणि तिकडून पुन्हा इकडे असे नुसते धावत पळत आसल्याचे दिसून येते.
एकदाका रुग्णांचे डिस्चार्ज प्रकिया पुर्ण झाल्यानंतर रुग्णांचे फोटो काढण्यासाठी १०० नंबर विभागात रुग्णाला घेवुन येण्यास सांगितले जाते.नुकतीत शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णामध्ये चालण्याची व बसवण्याची ताकद नसते तरीही अशा अवस्थेत त्याला १०० नंबर विभागात फक्त फोटो काढण्यासाठी बोलावण्यात येते.इथे आल्यानंतरही त्या रुग्णाचा
तात्काळ फोटो न घेता त्याला तीन तीन चार चार थांबवले जाते फोटो काढण्यासाठी आलेल्या रुग्णामध्ये बसण्याची ताकद नसल्याने ते अक्षरशः; खुर्चीवरच अंग टाकतात.
रुग्णांच्या एखाद्या नातेवाइकांनी फाईल पुर्तेते बाबत किंवा रूग्णाच्या फोटो काढण्याबाबत १०० नंबर विभागातील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यास तेथील कर्मचारी नातेवाईकांना व्यवस्थीत माहीती न देता उद्धट उत्तरे देतात व वेळ प्रसंगी रुग्णाची फाईल देखील भिरकावून दिली जाते अशा कर्मचाऱ्यांच्या उद्दाम पणामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना मध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
राज्य सरकारने आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळाव्यात या हेतूने ससून रुग्णालयात आरोग्याच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.त्यावर राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करीत आहेत.
सोयीचे ठरणार्या पुणे शहरातील ससून रुग्णालयात समन्वया अभावी’रुग्णांची हेळसांड होत असून,रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर कठोर पावले उचलण्याचा इशारा समाजसेवकांनी दिलेला आहे.
.