प्रतिनिधी अक्षय दोमाले
पुणे -लोकशाहीतील बलवान पक्ष म्हणजेच राष्ट्रीय पक्ष हा प्रादेशिक पक्षांना दुर्बल कसे करता येईल या करता अधिकाधिक प्रयत्न करीत असल्याचे सध्याच्या राजकारणातून दिसून येते.त्याचप्रमाणे सध्या नेत्यांच्या पक्षांतराला आणि पक्षफोडी ला उधाण आलेले आहे. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षांमध्ये राजकीय नेत्यांच्या ज्या काही बेडूक उड्या सुरू होतात त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे मात्र चांगलेच मनोरंजन होते तर निष्ठावंत कार्यकर्त्याची कमालीची कुचंबना होताना दिसून येते. बेरोजगारांचा आणि गुन्हेगारांचा राजकीय क्षेत्रात सुरू झालेला मुक्तसंचार ही चिंताजनक बाब आहे तशाच प्रकारे एका पक्षातून दुसर्या पक्षात उड्या मारणारे आणि येनकेन प्रकारे स्वतः कायमस्वरूपी सत्तेत खुर्ची ला चिटकुन राहणारे आयाराम आणि गयाराम यांनी राजकीय पक्षांची हतबलता स्पष्ट केली आहे.
पक्षनेतृत्वाने दिलेला आदेशाचा निमूटपणे पालन करणे कार्यकर्त्यांना बंधनकारक असते.मात्र, अलिकडे पक्ष पूर्वीसारखा राहिला नाही अशी भावना अनेक कार्यकर्ते खासगीत बोलून दाखवतात.विशेषतः अन्य पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश दिलेल्या नेत्यांची संख्या पाहता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावना अडगळीत पडल्यासारखी आहे.
बाहेरून आलेल्या नेत्यांना प्रवेश देण्यापर्यंत कार्यकर्त्यांनी सहनही केले. मात्र, पक्षप्रवेश आणि लगेचच उमेदवारी देण्याच्या पॅटर्नमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण झालेली आहे. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या नेत्याला उमेदवारी मिळत असल्याने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्ते हतबल होताना दिसून येतात.राजकारणात निष्ठावंत म्हणजे पक्षाशी निष्ठा असलेला म्हणजेच पक्षधोरण व पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ असलेला यामध्ये सांग कामे करणारे कार्यकर्ते देखिल येतात.तर पक्षाकडून काहीतरी मिळेल या आशेवर तेही निष्ठावंताच्या यादीत असतात..
पक्षनेतृत्वाच्या अशा विचित्र धोरणामुळे पक्षात वर्षानुवर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची दुहेरी अडचण झाली आहे. एकीकडे बाहेरून आलेल्यांना पक्षप्रवेश देऊन थेट उमेदवारी देत आहेत तर दुसरीकडे जे राजकारणात या पुर्वी कधीही नव्हते व आत्ताही नाहीत अशांना पक्षाची उमेदवारी देवून त्यांना निवडून आणण्यासाठी आहोरात्र प्रयत्न केला जात आहे.