पुणे – दिं- १७ एप्रिल २०२४ महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्राहकांनी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलेले आहे. त्या कर्जाच्या रकमेतून छोटे व्यवसाय सुरू केले होते. कोरोना संक्रमण काळात सर्व व्यवसाय बंद असल्याने त्यांचे उत्पन्नही थांबलेले होते . त्यामुळे या कर्जाची परतफेडीच्या रक्कमेचे हप्ते भरण्यास दिरंगाई झाल्याने थकीत रकमेची तिप्पट चौपटीने रकमेची वसूली फायनान्स कंपनीकडून सध्या सुरू आहे. . त्यामुळे कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्यासाठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्न कर्जधाररकांसमोर उभा आहे ..
कर्जाची परतफेड करण्यासाठी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तगादा लावला जात आहे.जवळ पैसा नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आल्याची भावनाही काही कर्जधारक व्यक्तीकडून केली जात आहे.
परराज्यातील फायनान्स कंपन्यांच्या पठाणी वसुलीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सदर कंपन्या मार्फत २० ते २५ टक्के दराने व्याजासहित रकमेची वसुली करीत आहेत. कंपनीचे कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन घरातील वस्तू जप्त करून त्या विकण्यात येत आहेत. अशा वसूलीच्या पध्दतीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत.यातुन कर्जदारांची सुटका होणे आवश्यक आहे.
अशा पठाणी वसुलीमुळे कर्जदार घर सोडून जाण्याच्या मनःस्थितीत आहेत.कर्जदारांच्या मागे तगदा लावत असल्यामुळे अनेक वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. त्यातून हाणामारीचे प्रकारही घडताना दिसून येतात.
फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळण्यासाठी नागरिकांना अधिक धावधाव करावी लागत नाही. एका फोनवर कर्ज बँक खात्यावर जमा होते. त्यामुळे कर्जाचे व्याज दर अधिक असूनही नागरिकांकडून कर्ज घेण्यासाठी पसंती असते.फायनान्स कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना कर्ज किती वर्षापासून थकीत आहे अशा वसूलीवर रोख रकमेचे बक्षीस देत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्कडून अनेक वेळा कर्जदारांकडुन पठाणी वसुली करीत आसल्याचे दिसून येते. बहुतांशी फायनान्स कंपनीचे व्याजदर आरबीआयच्या नियमावली बाहेर आल्याने कर्ज वसुलीसाठी साम ,दाम,दंडांचा वापर करतानाही दिसतात.