पुणे:- आज पासून पुणे लोणी काळभोर येथे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिगंबर जोगदंड यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे .
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे…
१) अनुसुचित जाती गटाकरिता एकत्रीत असलेल्या १३% आरक्षणाची अ, ब, क, ड नुसार वर्गवारी करून मातंग समाजासह उपेक्षीत वंचित जातींना आरक्षणाचा लाभ द्यावा.
२) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा व मुंबई विद्यापीठास त्यांचे नांव देण्यात यावे.
३) बार्टीच्या धर्तीवर आर्टी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात यावी.
४) क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगातील शिफारशीची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
५) साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे विकास महामंडळास १००० कोटी भाग भांडवल उपलब्ध करून महामंडळ तात्काळ सुरू करण्यात यावे.
६) आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद यांच्या संगमवाडी येथील समाधीस्थळी स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या सह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे.
उपोषण कर्ते दिगंबर जोगदंड यांची प्रतिक्रिया..
आज मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी पुणे ते नागपूर पायी चालत असताना त्याठिकाणी कोणत्याही आमदार किंवा खासदार यांनी व चालू सत्तेतल्या मंत्र्यांनी विष्णू भाऊ कसबे यांची कोणत्याही प्रकारची विचारपूस झाली नाही या आमदार खासदार याना मातंग समाज हा मतदानासाठी चालतो.मातंग समाजाचे प्रश्न विधानसभेत का मांडत नाहीत ही मातंग समाजाला खूप मोठी खंत आहे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी व मातंग समाजाला स्वातंत्र्य आरक्षण मिळण्यासाठी हवेली तालुका सखल मातंग समाजाचे नेते दिगंबर जोगदंड हे दिनांक 10/12/2023 रोजी उपोषणास बसले आहेत जोपर्यंत राज्यातले आमदार मातंग समाजाच्या मागण्या विधानसभेत लक्षवेधी करत नाहीत तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील असा इशारा हवेली तालुका सखल मातंग समाजाचे नेते दिगंबर जोगदंड यांनी सरकारला इशारा दिला आहे