लोणी काळभोर – 30 जानेवारी 1950 रोजी डॉ राजेंद्र प्रसाद यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली होती. भारत 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी पासून आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय.
भारताचा प्रजासत्ताक दिन हा सर्वत्र मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.विविध शासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत कार्यालय,तसेण विविद सोसायटी मध्ये प्रजासत्ताक दिन सोहळा आयोजित केला जातो.
हा दिवस गणतंत्र दिन म्हणून ही संबोधला जातो .. या दिवशी संविधानाचे जनक विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 26 जानेवारी 1950 साली संपूर्ण भारत देशाला संविधान देऊन देशाला राजतंत्रातून लोकशाहीत आणले त्यामुळे
हा दिवस संपूर्ण भारत देशात साजरा केला जातो.
आज पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील कदम वाक वस्ती येथील एंजल हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला होता.या कार्यक्रमास विविध स्तरांवरील मंडळींना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध महापुरुषांचे फोटो लावण्यात आले होते. ज्या महापुरुषाने भारत देशाचे संविधान लिहीलेले आहे ते महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांचा फोटो लावलेला नव्हता.तसेच स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचाही फोटो लावण्यात आलेला नसल्याचे दिसून आले.
या घटनेचा स्थानिक नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.समाजाला व विद्यार्थ्यांना या राष्ट्रपुरुषांची ओळख दडवून ठेवणाऱ्या शिक्षण संस्थेवर स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी होत असताना संबंधित शिक्षण संस्थेवर पुणे जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी कारवाई करणार का ? संबंधित शिक्षण संस्थेच्या चुका पाठीशी घालणार कि कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.